लोकसंख्या-वाढ-एक-समस्या-निबंध
लोकसंख्या वाढ एक समस्या निबंध 

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आपण आज या विषयावर लोकसंख्या वाढ एक समस्या निबंध  Loksankhya Visphot Marathi Nibandh बघणार आहोत. लोकसंख्या ही आजच्या काळातील एक भीषण समस्या बनत चालली आहे हे आपण जाणतात पण या मागची कारणे लोकांना जाणीव करून देणे उपायोजना समाजातील अडाणीपणा इत्यादी गोष्टी कारणे असले तरी जनजागृती आणि प्रबोधन करणे आवश्यक आहे तयाविषयी चिंतनात्मक निबंध आपण बघणार आहोत चला तर मग जेवणाला सुरुवात करुया



निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे:-

  1. जून 2000 मध्ये भारताची लोकसंख्या 100 कोटी
  2. लोकसंख्येचा वेग रोखणे आवश्यक
  3. आगरकर, र धो कर्वे, यांनी लोकसंख्या च्या बाबतीत धोक्याचा इशारा दिला होता,
  4. प्रसारही खूप झाला होता लोकसंख्या नियंत्रणाचा अयशस्वी
  5. कुटुंब नियोजन आवश्यक
  6. वाढते आयुर्मान हेही एक कारण
  7. बेरोजगारी, गुन्हेगारी, दहशतवाद हे दुष्परिणाम
  8. लोकसंख्या विस्पोट स्फोट होत नाही जाणवतात ते फक्त दुष्परिणाम
जून 2000 मध्ये आम्ही आमच्या दिवस झालं. म्हणजे वीस वर्षांपूर्वी भारताची लोकसंख्या 100 कोटी झाली. आता तर ती त्याच्याही पुढे गेली आहे. लोकसंख्या दृष्टीने विचार केला तर जगात आपला दुसरा क्रमांक आहे. आता तो पहिला होण्यास विलंब लागणार नाही. शंभर कोटी या लोकसंख्येच्या आपल्यावर जन्माला आलेल्या कन्येचे नाव कौतुकाने आत्ता ठेवले गेले. पण लोकसंख्येची गती रोखली पाहिजे, त्याबद्दल आम्हाला खरोखरच असता वाटत आहे का ?
गेल्या पन्नास वर्षातील लोकसंख्येच्या बाबतीत आपली प्रगती आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताची लोकसंख्या ते तीस कोटी होती. आज शंभर कोटीच्या पुढे गेली आहे. दर महिन्याला ही लोकसंख्या दोन लाखांनी वाढत आहे. आज जगातील प्रत्येक सहा माणसांमागे एक भारतीय माणूस आहे आणि ही लोकसंख्या गुणाकाराच्या पटीने वाढत आहे. त्यामुळे आज भारताचे प्रत्येक समस्येचे मूळ कारण वाढती लोकसंख्या हेच आहे.
१८८८ चाली थोर विचारवंत आगरकर यांनी तत्कालीन भारतीयांना याबाबतीत धोक्याचा इशारा दिला होता. अन्नधान्य म्हणजे हे बेरजेच्या गतीने वाढते, पण माणसाची संख्या मात्र गुणाकाराच्या प्रमाणात वाढते. त्यानंतर रघुनाथराव कर्वे व इतर काही विचारवंतांनी ' वाढत्या लोकसंख्येचा धोका' समाजाला जाणीव करून देण्याचे आटोकाट प्रयत्न केले. पण कर्मठ, सनातनी समाजाने या विचारवंताची टर उडवली. त्यांची फळे आज आपला समाज भोगत आहे. आज प्रत्येक समस्येचे मूळ कारण लोकसंख्येचा विस्फोट हेच आहे. आजवर ' कुटुंब लहान सुख महान' हे तत्त्व लोकांना समजावून देण्यासाठी शासनाने कोट्यावधी रुपये खर्च केले. क्वचित काही समाजकंटकांनी परिवार नियोजनाचा प्रसार केला. मोठ्या, वाढत्या कुटुंबामुळे येणाऱ्या दुःखाचे दर्शन घडवणारे ' प्रपंच' सारखे काढले. पण या सर्वांचा भावा तसा तितकासा परिणाम झाला नाही. अर्थातच ह्या सर्व गोष्टी आज पासून बावीस वर्षांपूर्वीचे आहेत. पण आजही लोकसंख्येचे यापेक्षाही भयावह परिणाम आपण बघतोय
याला खूप कारणे आहेत. मुख्य म्हणजे आपली सनातनी, कर्मठ वृत्ती, मुलगा हा वंशाचा दिवा. तो तर हवाच. मग चार-पाच कन्या झाल्या तरी मुलांसाठी प्रयत्न चालूच ! उच्च दर्जाच्या सार्वजनिक आरोग्याची हमी नसल्यामुळे आपले सर्व मुले रोगराईच्या तडाख्यातून वाचतील याची प्रत्येकाला खात्री वाटत नाही. म्हणून असे लोक अनेक अपत्यांना जन्म देतात. अशात गतीतून आपण शंभर कोटीच्या घरात पोहोचलो.
आता मात्र ही सामाजिक चिंताजनक समस्या झाली आहे. ' आम्ही दोघे आमचे दोघे' ही शासनाने घोषणा आहे. आम्ही दोघे आमचा एकच ही घोषणा आता पण स्वीकारली पाहिजे. काही काळ आपण स्वतः अपत्य निर्मिती न करता अन एकनाथाचे पालकत्व स्वीकारले पाहिजेत. लोकसंख्यावाढीला आणखीन एक महत्त्वाचे कारण म्हणजे आज माणसाचे वाढलेले आयुर्मान विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे. अनेक विकारांवर आम्ही मात केली आहे. बालमृत्यूचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. आपल्या वाढत्या लोकसंख्येला आळा घातला पाहिजे, तरच आपण विद्यमान लोकसंख्येला सुखात ठेवू शकू. नाहीतर आपण आपल्या हरितक्रांती श्वेतक्रांती, ही आपल्या वाढत्या लोकसंख्येला अपुरी पडणार आहे. रोगराई, बेकारी, गुन्हेगारी, दहशतवाद ही सर्व वाढत्या लोकसंख्येची लेकर आहेत असे म्हणता येईल ही अफाट लोकसंख्या भारताला वरदान न ठरता शापच ठरणार आहे.

तर मित्र-मैत्रिणींनो अशाप्रकारे आपण  लोकसंख्या वाढ एक समस्या निबंध । Loksankhya Visphot Marathi Nibandh बघितला तेव्हा लोकसंख्या प्रतिबंध याविषयी जनजागृती करणे किती आवश्यक आहे याची आपल्याला जाणीव झाली असेल त्यामुळे शालेय सामाजिक कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी इत्यादीमध्ये केलेले प्रबोधन हे अपुरे ठरत असून प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना रुजायला हवी अन्यथा लोकसंख्या हा असा विस्फोट आहे त्याचा स्फोट होत नाही दिसतात मात्र दुष्परिणाम असे स्वातंत्र्यापूर्वीच समाजसुधारकांनी भाकीत केले होते सत्य झाली आली पण तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.
********

👇 खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.