![]() |
वाचनाचे महत्व मराठी निबंध |
निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे:-
- वेगवेगळे छंद
- माझा आवडता छंद वाचन
- वाचनाचे लाभ
- मनोरंजन ज्ञानात भर
- आनंद प्रसन्नता मिळते
- व्यक्तिमत्व विकास होतो
- बहुश्रुतता वाढीस लागतो
- स्वामी विवेकानंद आणि बाबासाहेब यांचे ग्रंथ वाचन आणि वाचनावरील प्रेम
- जीवनात मार्गदर्शन घडवतात ग्रंथ आणि पुस्तके पर्यायाने वाचन
- खरा मित्र सच्चा सोबती वाचन
- असा धरी छंद जाई तुटुनी या भाऊबंद
' प्रत्येकाने वाचावे, म्हणजे तो वाचेल' हे वचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश स्वरुपात सांगितले आहे. प्रत्येकांना वाचनाची गोडी लावून घ्यावी. वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आजूबाजूच्या जगातील माहिती होते. माणूस अशिक्षित राहिला, तर त्याची सगळीकडून फसवणूक होते. वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतो, विचार शक्ती वाढते आणि आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. वाचनामुळे आपण सुशिक्षित होतो. समाजातील सर्वच शहरांच्या लोकांशी वागण्याची कला वाचनाने अवगत होते.
शिकलेल्या माणसाला आपली प्रगती करता येते. हल्लीचे पालक मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत खूप जागरूक असतात. त्यांना सुविधा आणि सुशिक्षित करण्याकडे, चांगले घडविण्याकडे त्यांचे लक्ष असते. मुलांच्या प्रगतीत पालकांचा वाटा असतोच. मुलांनी मागे न राहता जगाबरोबर धावावे, याकडे त्यांची धडपड असते, कल असतो. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ' वाचाल, तर वाचाल' हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश लक्षात ठेवला पाहिजे'
वाचन ज्याप्रमाणे ज्ञानात भर घालते त्याचप्रमाणे मनोरंजनही करते. कंटाळवाणा प्रवास, रिकामा वेळ आपण वाचनाच्या छंदामुळे सुसह्य करू शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक क्रांतिकारकांना, देशात सेवकांना दीर्घ कारावास सहन करावा लागला. तेथे वाचनाचा छंद त्यांना फार उपयोगी पडला. उत्तम पुस्तक वाचतांना वर्तमानातील सर्व चिंता, काळजी यांचा विसर पडतो. उत्तम ग्रंथाच्या वाचनाने विलक्षण आनंद मिळतो, मनाला प्रसन्नता लागते. खूपचं करणारी व्यक्ती भविष्य होते. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा उत्तर विकास होतो.
आज जगात होऊन गेलेल्या अनेक थोर व्यक्तींनी आपल्या वाचनात या छंदाचा गौरवाने उल्लेख केला आहे. त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद इत्यादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाचा विलक्षण छंद होता. ते गमतीने म्हणत की," माझ्या मृत्युनंतर माझ्यावर ग्रंथाच्या दुकानदाराचे देणे राहील." उत्कृष्ट ग्रंथाचा अनमोल ठेवा आणि ' वाचाल तर वाचाल' असा अनमोल संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला देऊन गेले. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यांची बुद्धिमत्ता कुशाग्र होती स्मरणशक्ती दांडगी होती एकदा वाचलेली गोष्ट ते कधीच विसरायचे नाहीत त्यांनासुद्धा भाषणांचा विलक्षण छंद होता. एकदा तर ग्रंथपाल सुद्धा त्यांना म्हणाला की तुम्ही पुस्तके वाचता की नुसतं पाने चाळता कारण एक महिना कालावधीच्या पुस्तकांना लागायचा हे स्वामीजी तीन दिवसातच वाचून काढायचे आणि तेही पान नंबर सहीत त्यांच्या स्मरणात राहायचे याचा अनुभव आणि प्रत्यय त्या ग्रंथपालाने जेव्हा स्वामीजींना प्रश्न विचारले तेव्हा आला आणि तो चकित झाला तर असा वाचनाचा महिमा आघात आहे.
वाचनाचा छंद असणारी व्यक्ती इतरांना त्रासदायक होत नाही. अगदी वरच्या काळातही वाचनाचा छंद असलेल्या वृद्ध इतरांना पीडित नाही. उलट तो सर्वांना मार्गदर्शक ठरतो. नातवंडे वाचनात रमलेल्या आपल्या आजोबांना आपल्या शंका विचारू शकतात. वाचनाने बुद्धीला स्थिरता येते. कित्येक चरित्रग्रंथ आपल्या अडचणीवर मात करण्याची प्रेरणा देतात. एखाद्या ललित ग्रंथात आपल्याला आपले चित्रण आढळते. ऐतिहासिक ग्रंथ आपल्याला भूतकाळात फिरून. तर भौगोलिक साऱ्या विश्वाचा आपल्याला परिचय होतो. अध्यातमिक ग्रंथ वाचल्याने म्हणाला असामान्य उभारी येते, उत्कृष्ट काव्य आपली रसिकता जिवंत ठेवतात. कवी, लेखक, साहित्यिक यांच्या नजरेतून आपण जगाचे नवे दर्शन घेऊ शकतो.
ग्रंथ वाचन करणाऱ्या ग्रंथाच्या माध्यमातून विश्वाची अनोखी सफर ही करू शकतो. पुस्तकाच्या या जगाचे वर्णन करताना प्रसिद्ध समीक्षक शंकर सारडा लिहितात," पुस्तकांशी कधी तरी आपली मैत्री जुळते आणि मग पुस्तके जन्मभर आपली साथ-संगत करीत राहतात. पुस्तकाचे जग किती विशाल, किती अथांग..... जगातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाचे आपलं नातं जोडणारा आणि भूत, वर्तमान, भविष्यकाळाचे वेध घेणारे ' हे विश्वची माझे घर' याचा साक्षात्कार घडवणारे आहे.
वरील निबंध इयत्ता पहिली ते दहावी तसेच महाविद्यालयीन अकरावी-बारावी भाषा विषया करता उपयुक्त आहे. तर मित्रांनो तुम्हाला वाचनाचे महत्व मराठी निबंध । Vachanache Mahatva Nibandh In Marathi हा निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.
2 Comments
खूप उपयुक्त....
ReplyDeleteHo
Delete